कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण देश आर्थिक संकटात सापडला आहे. यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.
SBI बॅंकेच्या ग्राहकांना बचत खात्यात किमान २ हजार रुपये शिल्लक रक्कम ठेवण्याचा नियम होता. यात ग्रामीण भागासाठी १ हजार रुपये, छोट्या शहरांसाठी २ हजार रुपये आणि मेट्रो शहरांसाठी ३ हजार रुपये एवढी रक्कम खात्यात शिल्लक असणे बंधनकारक होते.
मात्र आता बॅंक खात्यात शिल्लक रक्कम ठेवावी लागणार नाही यासाठी ग्राहकांकडून एसएमएस शुल्क सुद्धा आकारला जाणार नाही. हा नवीन निर्णय स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सर्वच ग्राहकांना लागू होणार आहे.
खात्यात शिल्लक रक्कम न ठेवल्यास कोणताच दंड आकाराला जाणार नाही. तसेच इंटरनेट बँकिंग आणि चेक सुविधा असलेल्या ग्राहकांचा शुल्क सुद्धा माफ करण्यात येणार आहे. एटीएम मधील व्यवहारावर देखील कोणताच शुल्क आकारला जाणार नाही.
स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करुन ही माहीती आपल्या ग्राहकांना दिली.
Good news for SBI Savings Account holders! Now you don't have to pay charges for SMS service and non-maintenance of monthly average balance. #SavingsAccount #SMSCharges #MAB #SBI #StateBankOfIndia pic.twitter.com/v3IcqzcsUh
— State Bank of India (@TheOfficialSBI) August 18, 2020