• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, February 3, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home सामाजिक

एक लाख वारकऱ्यांसोबत मंदीर प्रवेश…

by The Bhongaa
August 30, 2020
in सामाजिक
A A

भारतातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे २२ मार्च रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन जाहीर केलं. यामुळे भारतातील जवळजवळ सगळेच उद्योग बंद करण्यात आले होते. गेली चार महीने सगळं बंद असल्यामुळे सर्वाधिक नुकसान हे मध्यम आणि सर्वसामान्य वर्गातील लोकांचं झालं आहे.

पण जसजसं लॉकडाऊन वाढत गेलं, यातुन हे लक्षात आलं की, लॉकडाऊन करुन देखील राज्य आणि केंद्र सरकारला विशेष काही करता आलं नाही. भारताने कोरोना रुग्णात ३० लाखांचा टप्पा पार केलाय. यामुळे लॉकडाऊन केल्याने काहीच निष्पण्ण झालेलं नसताना सरकार लॉकडाऊन कधी संपवणार, आणि सर्वसामान्यांचं आयुष्य पुर्वपदावर कधी येणार असा प्रश्न देशभरातुन विचारला जाऊ लागला आहे.

लॉकडाऊन काळात सर्वाधिक संघर्ष हा जत्रा आणि यात्रेमध्ये काम करणाऱ्या कलावंतांना सहन करावा लागलाय. कारण लॉकडाऊन काळात सगळं बंद असल्याने या कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यासोबत यावर अवलंबून असणाऱ्या छोटमोठ्या उद्योगांची देखील हीच दशा आहे. महाराष्ट्राची चारशे वर्षांची परंपरा असलेली पंढरपुरची आषाढी वारी देखील यावर्षी कोरोनामुळे रद्द करण्यात आली. महाराष्ट्रात दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी देहू ते पंढरपुर वारीत सहभागी होतात.

पण याच्या दुसऱ्या बाजूला हजारोंच्या संख्येने लहान आणि छोठे उद्योग वारीसोबत पंढरपुरला जात असतात. पण यात सहभागी असणाऱ्या सर्वांची पुर्ण वर्षाची उपजिवीका ही या आषाढी वारीवर अवलंबून असते. पण वारी रद्द झाल्याने यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आलेली आहे.

संबंधितबातम्या

बालदिनानिमित्त कर्णबधिर मुलांसाठी विशेष सहल, पुसाळकर स्वरनाद निवासी पुनर्वसन केंद्राचा उपक्रम

कुर्माप्रथे विरुद्ध लढण्यास आदिवासी महिला आता झाल्या सज्ज, समाजबंध संस्थेद्वारे सत्याचे प्रयोग शिबिर संपन्न

दलित मुलाच्या हत्येच्या आरोपी शिक्षकाला गावातील हिंदू गटाचं समर्थन, पहा व्हिडीओ

‘ती’ मुर्ती हिंदू देवताची नसून भगवान बुद्धाचीच: मद्रास उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय

या सोबत पंढरपुरात सुद्धा अनेक उदयोग आहेत जे पुर्णपणे मंदिरावर अवलंबून आहेत. हीच गोष्ट लक्षात घेऊन विश्व वारकरी परिषदेने येत्या ३१ ऑगस्टला विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं, यानंतर वंचित बहूजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाला पाठींबा देणार असल्याचं सांगितलं. मात्र संपुर्ण महाराष्ट्रातून प्रकाश आंबेडकरांवर टिकेला सुरवात झाली. पण काही स्तरावर या भूमिकेचं कौतुक देखील करण्यात आलं आहे.

विठ्ठल हा महाराष्ट्रातील संपुर्ण बहूजन समाजाचे श्रद्धास्थान आहे. यासोबत वारकरी संप्रदायाने सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा निर्माण केली आहे. यामुळेच आषाढी वारीत देशभरातून सगळ्याच जाती आणि धर्मांची माणसं सामील होतात. यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आणि कामगार वर्ग सहभागी असतो. वारीत पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना देखील तितकच महत्वाचं स्थान आहे जे की आपल्याला हिंदू धर्मात क्वचितच पाहायला मिळते.

याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी येत्या ३१ ऑगस्टला पंढरपुर मंदीर उघडण्यासाठी आंदोलन करणार आहेत. यात वंचित कार्यकर्त्यांसोबत विश्व वारकरी परिषद देखील समाविष्ट असेल. यात १ लाख कार्यकर्त्यांना घेऊन प्रकाश आंबेडकर पंढरपुरला जाणार आहेत. पण हे आंदोलन विठ्ठल मंदीराच्या उघडण्यासोबतच मंदीरावर ज्यांची उपजिविका अवलंबून आहे अश्या सर्वांसाठी महत्वाचं ठरणार आहे. लॉकडाऊन काळात देखील वंचित बहूजन आघाडीने बस सेवा सुरु करण्यासाठी “डफली बजाओ” आंदोलन संपुर्ण महाराष्ट्रात केले होते.

यामुळे महाराष्ट्रात तात्काळ बससेवा सुरु करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्राचं बहूजन समाजाचं श्रद्धास्थान असणारे विठ्ठल मंदीर देखील उघडले जावे. यासाठी ३१ ऑगस्टला आंदोलन होणार आहे.

Tags: पंढरपुरप्रकाश आंबेडकरबाळासाहेबवंचितवंचित बहूजन आघाडीविठ्ठलविठ्ठस मंदीर
ShareTweetSendShare
Previous Post

 ‘या’ दिवशी पृथ्वीच्या जवळून जाणार विमानाएवढा लघुग्रह; वेग असेल ताशी 29,376 किलोमीटर

Next Post

मोदींच्या ‘मन की बात’ला 4 लाखांपेक्षा जास्त डिसलाईक्स!

Related Posts

बालदिनानिमित्त कर्णबधिर मुलांसाठी विशेष सहल, पुसाळकर स्वरनाद निवासी पुनर्वसन केंद्राचा उपक्रम
ताज्या बातम्या

बालदिनानिमित्त कर्णबधिर मुलांसाठी विशेष सहल, पुसाळकर स्वरनाद निवासी पुनर्वसन केंद्राचा उपक्रम

November 21, 2022
कुर्माप्रथे विरुद्ध लढण्यास आदिवासी महिला आता झाल्या सज्ज, समाजबंध संस्थेद्वारे सत्याचे प्रयोग शिबिर संपन्न
सामाजिक

कुर्माप्रथे विरुद्ध लढण्यास आदिवासी महिला आता झाल्या सज्ज, समाजबंध संस्थेद्वारे सत्याचे प्रयोग शिबिर संपन्न

November 14, 2022
दलित मुलाच्या हत्येच्या आरोपी शिक्षकाला गावातील हिंदू गटाचं समर्थन, पहा व्हिडीओ
ताज्या बातम्या

दलित मुलाच्या हत्येच्या आरोपी शिक्षकाला गावातील हिंदू गटाचं समर्थन, पहा व्हिडीओ

August 17, 2022
‘ती’ मुर्ती हिंदू देवताची नसून भगवान बुद्धाचीच: मद्रास उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय
ताज्या बातम्या

‘ती’ मुर्ती हिंदू देवताची नसून भगवान बुद्धाचीच: मद्रास उच्च न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय

August 4, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories