अनेक जणांनी पाण्यातून प्रवास करताना बोटीचा वापर केला असेल. मात्र थर्माकोलपासून बनवलेल्या बोटीचा कधी वापर केला आहे का? बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी गावातील लोकांसाठी ही रोजचीच गोष्ट आहे. शिंदेवाडी येथील विंचरणा नदीवर 22 वर्षांपूर्वी एक तलाव बांधण्यात आला होता. तेव्हापासून लोक अशाच प्रकारे लोकं जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.
बीबीसी मराठीने यासंदर्भात फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तेथील लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, हे समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.
500 लोकांची वस्ती असलेल्या गावात अनेक जणांना पोहता येत नाही. त्यात महिलांचा देखील समावेश आहे. मात्र तरीदेखील त्यांना या थर्माकोलच्या बोटीवरून प्रवास करावा लागतो. या तलावाची खोली 40 ते 50 खोली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे जर एखादा व्यक्ती पाण्यात प्रवास करताना बुडाला, तर त्याला कोण जबाबदार असणार? असा प्रश्न तेथील ग्रामस्थांनी उपस्थित केला.
https://www.facebook.com/1218471521614509/posts/3054238424704467/?app=fbl
शिंदेवाडीचे ग्रामस्थ सांगतात की गावात येण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. थर्माकोलच्या बोटीचा वापर करूनच गावात यावं लागतं. त्यामुळे गावातील मुलांना स्थळ येणं देखील बंद झाली आहेत.
पावसाळा सुरू झाल्यानंतर हा तलाव भरतो आणि वर्षातील आठ महिने लोकांना थर्माकोलच्या बोटी वरूनच प्रवास करावा लागतो. कधी ना कधी सरकारचं आपल्या समस्यांकडे लक्ष जाईल अशी अपेक्षा तेथील ग्रामस्थांना आहे.