• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 2, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

बारामती तहसीलदारांना शिवधर्म फाऊंडेशनचं पत्र: नागरिकांचे हप्ते ३१ डिसेंबर पर्यंत पुढं ढकलण्याची विनंती

by The Bhongaa
September 24, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

सध्या कोरोना विषाणूने देशभरात थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक लोकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन पैशाची अडचण निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे अनेक लोक घेतलेली कर्ज, वस्तू याचे हप्ते भरण्यासाठी असमर्थ ठरत आहेत. या गोष्टीचा विचार करून महाराष्ट्रातील शिवधर्म फाऊंडेशन यांनी बारामती तहसीलदार यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील लोकांचे हप्ते ३१ डिसेंबरपर्यंत पुढं ढकलावे, अशी विनंती केली आहे.

या पत्रामध्ये त्यांनी, “कोरोनाने महाराष्ट्रात थैमान घातले असून, अनेक घरातील करते पुरुष मृत्युमुखी पडले आहेत, तर प्रोडक्शनची मागणी कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी कामगार कपात देखील झाली आहे. त्यामूळे अनेक व्यावसायिकांना कर्जाचे हप्ते भरणं कठीण झालं असून, त्यांना उदरनिर्वाह करणं अवघड झालं आहे.” असं म्हटलं आहे.

“अशा परिस्थितीत लोकांना हप्ते भरणं शक्य आहे का? त्यांनी जगावं की मरावं..याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. नाहीतर लोक कर्जाच्या हप्त्यांमुळे आत्महत्या करतील. त्यामुळे आम्ही फक्त हप्ते पुढं ढकलण्याची विनंती करत आहे, ना की हप्ते माफ करा असं आम्ही म्हणतोय. जर याची दखल घेतली गेली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत हप्ते पुढे ढकलावे अशी विनंती करत आहोत.” असंही त्यांनी पुढं म्हटलं आहे.

संबंधितबातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

तहसीलदारांना हे पत्र देतानाचा त्यांनी फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळे आता सरकार याची दखल घेऊन नागरिकांचे हप्ते पुढं ढकलणार का? आणि त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यावेळी साम्राज्या फाऊंडेशनचे सदस्य देखील उपस्थित होते.

Tags: बारामती
ShareTweetSendShare
Previous Post

जाणून घ्या: कशी आहे भारताची अंतराळ संशोधन संस्था इस्रो?

Next Post

हत्तीच्या विष्टेपासून तयार केलेली जगातील सर्वात महाग काॅफी; एक कप फक्त 3500 रुपयांना!

Related Posts

ताज्या बातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

May 13, 2023
ताज्या बातम्या

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

May 1, 2023
Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories