काल आयपीएलचा १९ वा सामना दिल्ली कॅपिटल आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या दोन संघात रंगला होता. रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सर्वप्रथम फलंदाजीसाठी आलेल्या दिल्लीने १९६ धावा काढल्या. त्यात पृथ्वी शॉ(४२ धावा), शिखर धवन(३२ धावा) , रिषभ पंत(३७ धावा) , स्टॉयनिस(५३ धावा) एतक्या धावा काढल्या.
रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरचा संघ मात्र केवळ १३७ धावाच करू शकला. दिल्लीने हा सामना ५९ धावांनी जिंकला. दिल्ली हा सामना जिंकून पॉइंट टेबल मध्ये ८ गुणांसह पहिल्या स्थानावर गेली आहे.
या सामन्यादरम्यान बॅंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने टी२० क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विराट कोहलीने टी२० क्रिकेटमधील ९००० धावा पूर्ण केल्या आहेत. यासह टी२० क्रिकेटच्या इतिहासात हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील ७वा खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये २८६ सामने खेळले आहेत.
टी२० क्रिकेटच्या इतिहासात हा पराक्रम करणारा तो भारताचा पहिला खेळाडू आहे या यादीत भारताच्या आणखी दोन खेळाडूंचा समावेश आहे. भारताचा रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी असून त्याच्या धावा ८८१८ येवढ्या आहेत. सुरेश रैना तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या धावा ८३९२ येवढ्या आहेत.