राज्यात वाढते रस्ते अपघात पाहता महाराष्ट्र सरकारने बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी दिली आहे. तब्बल 5 वर्षांनी या योजनेला मंजुरी मिळाली आहे. बाळासाहेब ठाकरे योजने अंतर्गत अपघातानांतर पहिल्या ७२ तासात अपघाग्रस्तांना सेवा उपलब्ध होणार असून अपघातग्रस्त रुग्णास पूर्णपणे मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहे.
गेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली. तत्कालीन आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी २०१५ च्या अखेरीस बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची घोषणा केली होती.
या योजनेचा हेतू मृत्यूचे व अपांगत्वाचे प्रमाण कमी करणे असा असून या योजनेसाठी ठाकरे सरकारने चार समित्यांची स्थापना केली असून या समित्या सर्व कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी नेमल्या आहेत. सोबत या योजनेत ७४ उपचार पद्धतीतून अपघाग्रस्तांना उपचार घेता येणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कुठल्याही नागरिकाला राज्यात अपघात झाल्यास, त्याला मदत मिळणार आहे. तसेच अपघातग्रस्त व्यक्तीला ३० हजार रुपया पर्यंतच्या उपचाराचा खर्च शासनाकडून मोफत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी १२५ कोटी रुपये लागणार आहेत.