केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रेल्वे वाहतूक कोलमडल्याने पंजाबला होणाऱ्या अनेक वस्तूंचा पुरवठा थांबला आहे.
शेतकरी आंदोलनामुळे रेल्वे रूळ आणि मालगाड्यांच्या सुरक्षेचा विचार करता भारतीय रेल्वेने पंजाबला येणाऱ्या सर्व मालगाड्या रद्द केल्या आहेत. मालगाड्या रद्द झाल्याने पंजाबमध्ये अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याअभावी उद्योगांसाठीही समस्या निर्माण झाल्या आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मालगाड्या आणि रेल्वे रुळांच्या सुरक्षेची हमी पंजाब सरकार घेत असेल तरच मालगाड्या पंजाबला पाठवल्या जातील, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. पंजाब आणि केंद्र सरकारच्या या लढाईत आता पंजाब अंधारात जाण्याची भीती आहे.
पंजाब का जाईल अंधारात ?
पंजाबमधील औष्णिक वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा इतर राज्यांमधून केला जातो, हा कोळसा घेऊन मालगाड्या पंजाबमध्ये जातात. पण गेल्या काही दिवसांपासून मालगाड्यांची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. पण प्रवासी गाड्यांची वाहतूक होत असेल तरच आंदोलन करू, मालगाड्यांच्या वाहतुकीला आमचा विरोध नाही. मालगाड्या आडवल्या जाणार नाहीत, असं शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात पीएसपीसीएल सध्या नॅशनल ग्रीड आणि इतर राज्यांमधून वीज खरेदी करून राज्यातील वीजेची मागणीची पूर्तता करत आहे. पण ही वीज खरेदी करण्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या नॅशनल ग्रीड व अन्य राज्यांना आगाऊ पैसे द्यावे लागतील.
आंदोलनामुळे रेशनला बाधा.
पंजाबमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे महाराष्ट्राचा रेशन पुरवठा देखील कमी झालाय, त्यातच नाशिक शहरातील 230 दुकानांचा पुरवठा कमी झाला असून गोदामात मान्य नसल्यामुळे दुकानांमध्ये जाऊ शकत नाही.
महत्वाच्या बातम्या –
आजपासुन राज्यात सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू होणार!
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कोरोनामुक्त…
सकाळ समूहाने केला न्यूजलॉन्ड्रीवर मानहानीचा गुन्हा दाखल; ६५ कोटी मानहानीची रक्कम!