भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये दिल्लीत झाला. विराट कोहलीचा हा ३२ वा वाढदिवस आहे. या दिनानिमित्त जाणून घेऊया त्याच्या कारकिर्दी बद्दल, वयाच्या १९ व्या वर्षी विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आला. कोहलीने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अनेक विक्रम स्वतच्या नावावर केले. क्रिकेट विश्वातल्या बऱ्याच दिग्गजांना त्यानं मागे टाकलं आहे. आक्रमक फलंदाजीसाठी तो जगभरात प्रसिद्ध आहे. आणि जगातला उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्याला मानलं जात.
विराट कोहलीने कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी-२० सामने खेळून क्रिकेटच्या या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण ४१६ सामने खेळले आहे. हे सामने खेळत त्याने एकूण ७० शतकं केली आहेत. सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुलकर(१०० शतके) आणि (रिकी पॉण्टिंग ७१ शतके) या दोन खेळाडूंच्या नावावर आहेत. येणाऱ्या दिवसात विराट कोहली यांनाही मागे टाकत एक नवीन विश्वविक्रम नावावर करेल.
विराटच्या जिद्द आणि चिकाटी बद्दल बोलायचं झाल तर त्याचा एक निर्णय तुम्हाला माहिती आहे का?
२००६ मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर रणजी ट्रॉफीचे सामने चालू होते. दिल्ली आणि कर्नाटक संघात सामना दुसऱ्या दिवशी सामना होता. त्या अगोदरच्या दिवशी म्हणजे रात्री विराटचे वडील प्रेम कोहली यांचे निधन झाले होते. अशी परिस्थिती असतानाही अंत्यसंस्कारासाठी जाण्याऐवजी त्याने दुसऱ्या दिवशी मैदानात जाऊन फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यादिवशी कोहलीने ९० धावांची खेळी खेळत दिल्लीला स्पर्धेच्या बाहेर जाण्यापासून वाचवले. आणि नंतर तो वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला. त्याच्या या निर्णयाच आणि त्याची ही कामगिरी पाहुन सगळीकडे विराटचे कौतुक झाले होते.
विराट कोहलीने आतापर्यंतच्या कारकीर्दीत ८६ कसोटी सामन्यामध्ये एकूण ७२४० धावा काढल्या आहेत. तर वनडेमधील २४८ सामन्यांमध्ये एकूण ११८६७ धावा आणि टी-२० खेळात ८२ सामन्यामध्ये एकूण २७९४ इतक्या धावा काढल्या आहेत. विराट कोहलीला भारतीय क्रिकेट संघाचा उत्कृष्ट फलंदाज आणि सर्वात यशस्वी कर्णधार देखील समजलं जातं.
कसोटी सामन्यांमध्ये सलग ४ दुहेरी शतक करणारा विराट कोहली हा एकमेव खेळाडू आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ८०००, ९०००, १०००० आणि ११००० इतक्या धावा करण्याचा विक्रमही विराट कोहलीच्याच नावावर आहे.विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली भारताने २००८ मध्ये अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकावर भारताच कोरलं होतं. ११ डिसेंबर २०१७ मध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत त्याने लग्न केलं. विराट लवकरच बाबा बनणार आहे. असा हा विराट कोहलीचा प्रवास आहे.
महत्वाच्या बातम्या –
फलंदाजी करताना हेल्मेट घालणे बंधनकारक करावे -सचिन तेंडुलकर
ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी विराट आणि सौरव गांगुलीला कोर्टाची नोटीस!