आपण अनेक वेळा घरी किंवा आसपास नोकरदार लोकांकडून बोनस येणार आहे किंवा कधी येतोय बोनस, बोनस चांगला आलाय, दिवाळी चांगली होईल. अशा गोष्टी ऐकतो आणि त्यातल्या त्यात दिवाळी आणि बोनस हे तर ठरलेलंच समीकरण आहे. पण तुम्हाला कधी बोनस म्हणजे काय? आणि तो का मिळतो? हा प्रश्न पडलाय का? पडला असेलच, आता आपण बोनस म्हणजे नक्की काय, हे पाहूया.
दिवाळी बोनस म्हणजे नक्की काय?
एखाद्या कंपनीत किंवा संस्थेत पगाराशिवाय मिळणारी ठराविक रक्कम म्हणजे सर्वसाधारणपणे आपण बोनस असं म्हणू शकतो. तरी असा अर्थ असला तरी अनेक कामगार संघटनांचे असं म्हणणं असतं की, बोनस म्हणजे अधिक रक्कम नसून उशिरा दिलेलं वेतनच असतं.
“बोनस हा कंपनीला झालेल्या नफ्यावर अवलंबून असवा.” असं म्हणणं मालकांचं होतं, तर कामगार संघाना मात्र “नफा होवो अगर न होवो, किमान बोनस रक्कम वाढवून द्यावी” अशी मागणी ठाम होती. यावर मुंबई हायकोर्टाने “कंपनीला नफा झाला तर त्यातील काही रक्कम कामगारांना बोनस म्हणून द्यावी” असं सांगितलं होतं.
१९६२ साली याबाबत सरकारने ‘मेहेर आयोग’ नेमला. यामुळं नंतर १९६५ मध्ये ‘बोनस कायदा’ मंजूर झाला. या कायद्याला The Payment of Bonus Act, 1965 या नावाने ओळखले जातात.
बोनस दिवाळीत का दिला जातो?
या कायद्यानुसार 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष संपल्यानंतर आठ महिन्यांच्या आत कर्मचाऱ्यांना बोनस द्यावा लागतो. त्यामुळे कंपन्या दिवाळीच्या काळात बोनस देत असतात. त्यामुळे दिवाळी आणि बोनस हे समीकरण तयार झालं आहे.
कशी झाली देशाची पहिली सार्वत्रिक निवडणूक?
काय आहे ‘बोनस कायदा’?
१९६५ साली संमत झालेल्या या कायद्यात सांगण्यात आलं की, एखाद्या उद्योगसंस्थेला नफा होवो अगर ना होवो, कामगारांना त्यांच्या वेतनाच्या चार टक्के एवढी रक्कम देणं बंधनकारक आहे. १९७२ पर्यंत हा टक्का ८.३३ पर्यंत वाढवण्यात आला.
जा कंपनीत 20 पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात त्या कंपनीला आपल्या कामगारांना बोनस देणे बंधनकारक आहे. तसेच हा प्रत्येक कर्मचाऱ्यांचा देखील अधिकार आहे. ज्या व्यक्तीचा पगारे 20 हजार रुपये प्रती महिन्यापेक्षा जास्त आहे आणि त्याने मागच्या आर्थिक वर्षात कमीत कमी तीस दिवस काम केले आहे, त्याला कमीत कमी 8.33 टक्के बोनस देणे बंधनकारक आहे.
एकंदरीत कामगारांसाठी आणि नोकरदारांसाठी दिवाळी गोड व्हावी कारण बोनस हा साधारण दिवाळीलाच दिला जातो. त्याचबरोबर मालक आणि कामगार यांच्यामध्ये सलोखा टिकून रहावा आणि कामगारांना काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं अशी देखील कारणं आपण ढोबळमानाने सांगू शकतो. तर हा कामगारांसाठी हितकारक असा कायदा आहे.
जगाला हसवणाऱ्या मिस्टर बीन बद्दल तुम्हाला ‘ह्या’ गोष्टी माहीत आहेत का?
बोनस व्यतिरिक्त कामगारांचे आयुष्य सुखकर व्हावे, त्यांची आधीच खूप असलेली चिंता दूर व्हावी, यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कायदे लागू केले. यामध्ये कोळसा खाणीतील कामगारांचा विचार करून महागाई भत्ता, नुकसान भरपाई, बेकरी काळातील नुकसान भरपाई, कामगारांना वेतन व सवलती अशा अनेक गोष्टींना घेऊन बाबासाहेबांनी १३ मार्च १९५४ रोजी चर्चा केली.
त्याचबरोबर २९ मार्च १९५४ रोजी महिला कामगारांचा देखील विचार करून प्रसुतीवेळी विश्रांती, गैरहजर असताना पगार, चार आठवडे प्रसूती भत्ता अशा अनेक सुविधांवर चर्चा केली.
या सर्व गोष्टींमुळे कामगार आज जास्त नाही, पण थोड्या तरी प्रमाणात सुखी राहत असेल, असं आपण म्हणू शकतो.