राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनातील आरोप-प्रत्यारोप कधी संपतील आणि मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा कधी सुरू होईल या प्रतिक्षेत मुंबईकर आहेत. तर दुसरीकडे पश्चिम बंगालमध्ये ११ नोव्हेंबरपासून उपनगरीय रेल्वे सेवा सुरु करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याची माहिती रेल्वेमंत्री पियूष गोयल ट्विट करत दिली. “११ नोव्हेंबरपासून पश्चिम बंगालमधील उपनगरीय सेवा पुन्हा रुळावर येणार आहे. करोनासंबंधी सुरक्षेच्या सर्व नियमांची अमलबजाववणी करत प्रवासांना विना अडथळा प्रवास करता येईल याची काळजी घेतली जाईल,” असे पियूष गोयल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
? Railways will resume suburban services in West Bengal from 11th November.
With adequate safety measures in place, this will enhance passenger convenience and facilitate smooth travel for the people.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) November 5, 2020
दरम्यान लोकल सेवा पूर्ववत करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार आणि ईस्टर्न रेल्वेमध्ये मंगळवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतरच लोकल सेवा सुरळीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी साऊथ ईस्टर्न रेल्वेला लोकल सेवा सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली. मुंबईतील नागरिकांसाठी लोकल खुली करणे व रेल्वेच्या सज्जतेबाबतची माहिती, याबाबत राज्य सरकारने २८ ऑक्टोबरला मध्य आणि पश्चिम रेल्वेला पत्र पाठवले होते. यात अत्यावश्यक सेवा, कर्मचारी आणि सामान्य प्रवाशांना प्रवासासाठी वेळाही निश्चित केल्या होत्या. या पत्राला २८ ऑक्टोबरलाच मध्य आणि पश्चिम रेल्वेने उत्तर दिले.
लॉकडाऊन अगोदर लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या ८० लाख प्रवाशी होती. मात्र कोरोनाच्या नियमांमुळे सध्या २२ लाख लोकांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. तरी देखील यानंतर लोकलबाबत राज्य सरकार व रेल्वेकडून कोणतेच ठोस निर्णय घेण्यात आले नाहीत.
महत्वाच्या बातम्या – परदेशी नागरिक आता भारतातून चीनमध्ये जाऊ शकणार नाहीत -चीन
आंध्रप्रदेशात शाळा सुरु करताच ५७५ विद्यार्थी आणि ८२९ शिक्षकांना कोरोनाची लागण!
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई सोमवारपासून खात्यात जमा होणार -विजय वडेट्टीवार
दिवाळी; राज्यात देखील फटाके फोडण्यावर बंदी येणार?