महिला टी-२० स्पर्धेला बुधवारी ४ नोव्हेंबर पासून सुरुवात झाली. या स्पर्धेत एकूण तीन संघाचा समावेश आहे. हे तीन संघ एकमेकांविरुध्द चार सामने खेळणार आहेत. सुपरनोवाज, व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स हे तीन संघ आहेत. या तिन्ही संघामध्ये इंग्लंड, द.आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू आहेत. तसेच न्यूझीलंड,श्रीलंका आणि बांगलादेश मधले खेळाडू देखील संघामध्ये आहेत.
सुपरनोवाज संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही आहे. व्हेलोसिटी संघाची कर्णधार मिताली राज आहे तर ट्रेलब्लेझर्स संघाची कर्णधार स्मृती मानधना ही आहे. ९ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा फायनल सामना आहे.
आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये काय झालं ?
पहिला सामना झाला तो सुपरनोवाज आणि व्हेलोसिटी या दोन संघात. या सामन्यात सुपरनोवाज संघाने प्रथम फलंदाजी करत १२६ धावांचे आव्हान व्हेलोसिटी संघासमोर ठेवलं होत. या धावांचा पाठलाग करत व्हेलोसिटी संघाने १२९ धावा करून सामना विजयी केला. या धावा करताना ५ विकेट्स त्यांनी गमावल्या होत्या.
दुसरा सामना ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलोसिटी या दोन संघात झाला. या सामन्यात ट्रेलब्लेझर्सने बाजी मारली.ट्रेलब्लेझर्सने व्हेलोसिटीचा नऊ गडी राखून धुव्वा उडवला. व्हेलोसिटी संघाने प्रथम फलंदाजी करत फक्त ४७ धावा केल्या. यासोबत व्हेलोसिटी संघाने सर्व विकेट्स गमावल्या होत्या. ट्रेलब्लेझर्सने संघाने या धावांचा सामना करत ४९ धावा काढल्या आणि सामना विजयी केला. ट्रेलब्लेझर्सने फक्त एक विकेट्स गमावली होती.
७ नोव्हेंबरला तिसरा सामना खेळला जाईल. हा तिसरा सामना ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोवाज या दोन संघात होणार आहे. या नंतर पॉइंट टेबल नुसार स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल म्हणजे फायनल सामना असेल. हा अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होणार आहे. या तीन संघापैकी कोणते दोन संघ हा अंतिम सामना खेळातील हे पाहणं महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या – ऑनलाईन सट्टेबाजीला प्रोत्साहन दिल्या प्रकरणी विराट आणि सौरव गांगुलीला कोर्टाची नोटीस!
IPL: मुंबईचा सहाव्यांदा फायनलमध्ये प्रवेश…
त्या दिवशी विराट वडीलांच्या अंत्यसंस्काराला गेला नाही, पण मैदानात उतरला आणि…