भाजपसाठी पाकिस्तानपेक्षाही शेतकरी हाच मोठा शत्रू असल्याची बेधडक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. “बरोबर शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळू लागला की लगेच बाहेरून मालाची आयात होते. या सगळ्या गोष्टी शेती व्यवस्था नष्ट करण्यासाठीचा कट असल्याचं ते म्हणाले.” कृषी व कामगार कायद्याविरोधात सांगलीमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये त्यांनी या मुद्द्यांना हात घातला.
ही रॅली एसटी स्टँड ते नेमिथानगर अशी झाली. “कांदा, दूध पावडर, साखर अशा सगळ्या गोष्टी केंद्र सरकारने बरोबर शेतकऱ्यांना भाव मिळणार नाहीत अशा पद्धतीनेच आयात, निर्यात केल्या आहेत. कांदा आधी इराण त्यानंतर पाकिस्तानातून सरकारने आयात केला आहे. याचा अर्थ सरकारला आता पाकिस्तानपेक्षाही शेतकरी हा मोठा शत्रू वाटू लागला आहे.” असा आरोप त्यांनी यावेळी केला.
यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, डॉ. जितेश कदम, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
नक्की वाचा – महाराष्ट्रात ७ नोव्हेंबर ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून का साजरा केला जातो?
शाळांना १४ दिवसांची दिवाळी सुट्टी…