जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याप्रकरणी जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. “लोकांचा आवाज दाबून जम्मू काश्मीरमध्ये प्रेशर कुकरसारखी परिस्थिती निर्माण केली होती. एक वेळ अशी येईल जेव्हा सरकार हात जोडून विचारेल की राज्याला विशेष दर्जा पुन्हा देण्याव्यतिरिक्त आणखी काय हवं, असे म्हणत मेहबुबा मुफ्ती यांनी हल्लाबोल केला आहे.
मेहबुबा मुफ्ती या पीसीजीडीच्या होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गेल्या असताना “पीडीपी ही सद्यस्थितीत काहीही न बोलण्याची भूमिका घेणार नाही. तसंच जोपर्यंत राज्यात कलम ३७० पुन्हा लागू केलं जात नाही तोवर शांतही बसणार नाही. एक वेळ अशी असेल जेव्हा दिल्लीतील सरकार हात जोडून (काश्मीरच्या लोकांना) विचारेल की त्यांना राज्याला विषेश दर्जा पुन्हा देण्याव्यतिरिक्त आणखी काय हवं? असं देखील यावेळी त्या म्हणाल्या.
तसेच केंद्र सरकारनं कलम ३७० रद्द करून संविधानाचा गैरवापर केला आहे. भाजपाच्या अजेंड्यानुसार सध्या देश चालवला जात आहे. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आदोलकांना तुरुंगात बंद करण्यात येत आणि त्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. ही कोणत्या प्रकारची लोकशाही आहे. हेच रामराज्य आहे का? तुम्ही पीडीपीला का घाबरता?,” असा ही सवाल त्यावेळीं त्यांनी केला.
नक्की वाचा – शाळांना १४ दिवसांची दिवाळी सुट्टी…