आयपीएलचा २०२० हंगामाचा अंतिम सामना काल दिल्ली डेअरडेविल्स विरुध्द मुंबई इंडीमन्स यांच्या दरम्यान पार पडला. या सामन्या मुंबईने दिल्ली संघावर ५ विकेट्सने विजय मिळवला. मुंबई संघाने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.
प्रथम फलंदाजी करत दिल्ली संघाने मुंबईसमोर १५७ धावांच आव्हान ठेवलं होतं. यात मुंबईचा गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या स्विंग गोलंदाजीसमोर दिल्लीच्या फलंदाजांनी गुडघे टेकले, मात्र कर्णधार श्रेयस अय्यर ६५(50) आणि रिषभ पंत ५६(३८) यांच्या भागीदारीमुळे दिल्लीचा संघ सावरला.
मात्र मुंबईच्या फलंदाजांनी पहील्या षटकापासुन फटकेबाजी करत पहील्यापासुनच सामन्यात वर्चस्व निर्माण केलं, यात कर्णधार रोहीत शर्माच्या ६८(५१) धावा निर्णायक ठरल्या. यामुळे मुंबईला ह्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवता आला.
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात दिल्लीचा संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये धडकला होता. यासोबत मुंबई संघाने पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.