अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी एका वेगळ्या विषयावरून गौप्यस्फोट केला आहे. यामुळे एका नवीन वादाने या प्रकरणी तोंड वर काढले आहे.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अन्वय नाईक परिवाराशी आर्थिक व व्यावसायिक संबंध होते, आहेत. ते का लवण्यात आले. रश्मी उद्धव ठाकरे, मनिषा रवींद्र वायकर यांनी रायगड जिल्ह्यातील कोलेई (ता. मुरूड) येथे अन्वय मधुकर नाईक, अक्षदा अन्वय नाईक यांच्याकडून जमिनी घेतल्या. उद्धव ठाकरे, तुम्ही यासाठी अर्णब गोस्वामींना लक्ष्य करत आहात का?,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
या जमीन व्यवहारात मनिषा रवींद्र वायकर यांचेही नाव सोमय्या यांनी घेतलं आहे. तसेच त्यांनी जमीन व्यवहाराची कागदपत्रेही ट्विट केली आहेत.
ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार •गाव- कोलेई तालुका- मुरुड जिल्हा- रायगड महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक, रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे नव ठिकाणी दिसत आहेत. @BJP4Maharashtra@Dev_Fadnavis pic.twitter.com/w5PzrNQI96
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 11, 2020
यासोबत “ठाकरे परिवार अन्वय नाईक परिवार जमीन व्यवहार. गाव- कोलेई, तालुका- मुरुड, जिल्हा- रायगड. महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या वेबसाईटवर गाव नमुना ७/१२ प्रमाणे अक्षता व अन्वय नाईक-रश्मी उध्दव ठाकरे व मनीषा रवींद्र वायकर यांची नावे या ठिकाणी दिसत आहेत,” असे किरीट सोमय्या यांनी ट्विट मध्ये म्हणले आहे.
तसेच “रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतल्याचा” दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. “उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत?” असा सवाल देखील त्यांनी ट्विट मध्ये केला आहे.
दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
Arnab Goswami Release: सर्वोच्च न्यायालयाकडून अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज मंजूर
रोहित पवारांच्या ट्विटची दखल घेत धनंजय मुंडे म्हणाले…..