कोरोनाची पार्श्वभूमी बघता अनलॉक प्रक्रियेला सरकारने सुरुवात केली. परंतु दिवसेंदिवस कोरोना रुग्णवाढीचे आकडे बघता सरकारच्या चिंतेत भर पडण्याची शक्यता आहे. सध्याची आकडेवारी बघता प्रतिदिन कोरोना रुग्णामध्ये ४० ते ५० हजारा दरम्यान वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासांमध्ये ४७ हजार ९०५ कोरोना रुग्ण बरे झाले आहे. तर ५५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
या वाढत्या आकडेवारीमध्ये दिलासादायक बाब ही की कोरोनाचे ८० लाख ६६ हजार ५०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. भारतात सरकारने कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवले असल्याने त्वरित रुग्णावर उपचार करणे सोपे जात आहे. तसेच दिवाळी दसरा यामुळे लोकं घराबाहेर पडत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती तज्ज्ञांनी दर्शवली आहे.
दरम्यान, देशात ८६ लाख ८३ हजार ९१७ जणांना कोरोनाची बाधा झाली असून १ लाख २८ हजार १२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत देशात १२ कोटी १९ लाख ६२ हजार ५०९ इतक्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या – २४४ वर्षाच्या इतिहासात पराभवानंतर व्हाईट हाऊस न सोडणारे पहिले राष्ट्राध्यक्ष ट्रम्प…
अमेरिका इलेक्शन : ट्रम्प यांनी का घेतली कोर्टात धाव?