कोरोनाचे वातावरण निवळत असताना महाराष्ट्रासाठी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीती महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे.
त्यांनी यासंदर्भात राज्यातील सगळ्या डॉक्टरांना, सरकारी रुग्णालयांना, जि्ल्हा रुग्णालयांना, आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. ज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी तयार राहा असे म्हणले आहे.
केंद्र सरकारनं उचलेल्या पावलांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली -निर्मला सीतारामन
अर्चना पाटील यांनी लिहलेल्या पत्रात “ताप, फ्लू यांसारखी लक्षणं दिसत असल्यास त्यासाठी वेळेत सर्वे केला गेला पाहिजे. रोज होणाऱ्या चाचण्या कोणत्याही परिस्थितीत थांबवता कामा नयेत. शहरी आणि ग्रामीण भागातील फिव्हर क्लिनिक्स यांनी रोजचे अहवाल दररोज सादर करावेत. त्यामुळे नेमकी परिस्थिती काय आहे यावर लक्ष ठेवण्यास आरोग्य विभागाला मदत होईल.” असे म्हणले आहे.
अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिली ३१ मार्च डेडलाईन, म्हणाल्या…
त्याच बरोबर त्यांनी “सध्याच्या घडीला करोनाचे रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचं प्रमाण शहरी आणि ग्रामीण भागात कमी झालं आहे. मात्र कोविड आणि नॉन कोविड रुग्णांना वेळेत उपचार मिळणं गरजेचं आहे. त्यामुळेच ग्रामीण आणि शहरी भागातील कोविड सेंटर्सने सज्ज रहावं.” असा उलेख केला आहे.
दरम्यान दिवाळी दसरा या सणांमुळे लोकं घराबाहेर पडत असल्याकारणाने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती तज्ज्ञांनी दर्शवली आहे.