६ डिसेंबर १९५६ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झाले होते, यानंतर दरवर्षी ६ डिसेंबर रोजी दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता येत असतात. या ठिकाणी देशभरातुन लाखोंच्या संख्येने लोक उपस्थित राहतात.
ADVERTISEMENT
मात्र कोरोनाचं संकट लक्षात घेता, यावर्षी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. या क्रार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करु, मात्र चैत्यभूमी दर्शनासाठी बंद असणार आहे, त्यामुळे कुणीच गर्दी करु नका असं देखील मुंडे यावेळी म्हणाले.
दरम्यान, यामुळे यावर्षीचा महापरिनिर्वाण दिवशी लोकांना आपल्या घरातुनन अभिवादन करावं लागणार आहे.
ADVERTISEMENT