सध्या महाराष्ट्रातील राजकारणात टिकांची मालिकाच सुरु झालीय. नुकतेच लाॅकडाऊन काळातील वीजबिलात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सवलत मिळणार नसल्याबाबत जाहीर केलं. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत महाविकास आघाडीवर त्याचबरोबर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
या महाविकास आघाडी सरकारने "NIGHTLIFE” जास्तच मनावर घेतले आहे अस दिसते..
विज बिल इतके हातात दिले की, कोणच भरणार नाही.. मग काय अंधारच अंधार..
आणि मग..
Penguin Gang ची पार्टी सुरु!!!— nitesh rane (@NiteshNRane) November 19, 2020
काय म्हणाले नितेश राणे?
“महाविकास आघाडीने नाईटलाइफ जास्तच मनावर घेतलेलं दिसत आहे. एवढं वीजबिल कुणीच नाही भरल्यावर, सगळीकडे अंधारच अंधार. आणि मग…मग पेंग्विन गँगची पार्टी सुरू..” अशी टीका नितेश राणे यांनी नाव न घेता आदित्य ठाकरे यांच्यावर तसंच महाविकास आघाडीवर केली आहे.
नितेश राणे हे सतत त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये चर्चेत असतात. आता त्यांच्या या ट्विटवर महाविकास आघाडी काय प्रत्युत्तर देणार? याकडे लोकांचं लक्ष लागलं आहे.
महत्वाच्या बातम्या – सीबीआयला तपासापूर्वी घ्यावी लागणार राज्यांची परवानगी -सर्वोच्च न्यायालय
“स्वातंत्र्यांच्या लढ्यात ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये”
भाजपा आमदार प्रशांत बंब विरोधात पैशांसाठी कारखान्याचे बनावट खाते काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल
महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याचं धनंजय मुंडेंचं आवाहन!