मुंबई | मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात देखील “लव्ह जिहाद” कायदा आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रीया भाजप नेते किरीय सोमय्या यांनी दिली आहे.
यासोबत महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेते अस्लम शेख यांच्यावर देखील त्यांनी टिका केली आहे. “अस्लम शेख यांंनी याकुब मेनन याच्या फाशीचा विरोध केला होता. त्यांना आम्हाला सांगायाचंय की मुंबईमध्ये आम्ही लव्ह जिहाद चालु देणार नाही, उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादसाठी जो कायदा आणला आहे त्याचंं आम्हा समर्थन करतो, मात्र महाराष्ट्रात सुध्दा असाच कायदा आणण्यासाठी आम्ही विधानसभेत प्रस्ताव करणार आहोत,” असं देखील यावेळी किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, “अस्लम शेख जी भाषा वापरत आहेत तीच भाषा पुढे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे देखील वापरणार आहेत, यामुळे सत्तेत आल्यापासुन शिवसेनेचे रंग बदलेले आहेत” असा आरोप देखील सोमय्या यांनी केला.
महत्वाच्या बातम्या – जवानांनी मोठ्या विनाशकारी हल्ल्याचा कट लावला उधळून -पंतप्रधान
देश धार्मिक कट्टरता आणि आक्रमक राष्ट्रवाद या आजाराला बळी पडलाय -माजी राष्ट्रपती
विवादित ट्विटमुळे कुणाल कामरावर खटला चालवण्याची परवानगी…
प्रार्थनास्थळे उघडल्यामुळेच करोना रुग्णांची संख्या वाढली आहे -महापौर किशोरी पेडणेकर