एक वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलंच वादळ उठलं होतं. सरकार स्थापन करण्यासाठी एवढा गोंधळ याआधी क्वचितच झाला असेल. अतिशय नाट्यमय पद्धतीने आधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी एकत्र येऊन घेतलेल्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालं. मात्र हे सरकार केवळ ३ दिवसांच ठरलं आणि त्यावेळी सगळीकडे फक्त एकच चर्चा होती. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील राजकारण.
हे सरकार का ठरलं अल्पजीवी?
महाराष्ट्रात भाजपला सगळ्यात जास्त जागा मिळाल्या होत्या, मात्र भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही असं म्हणत शिवसेनेने आपलं म्हणणं ठाम ठेवलं. मग त्यानंतर राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस हे एकत्र येऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद तर जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रीपद देणार अशी चिन्हं होती.
यामुळे आपलं राजकीय करिअर धोक्यात आहे असा विचार करून अजित पवार यांनी काही आमदारांसह भाजपशी युती करून एका रात्रीत शपथविधी पार पडला आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र त्यानंतर शरद पवार यांनी सर्व आमदारांचे बंड मोडून महाविकासआघाडी स्थापन केल्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आलं आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना राजीनामा द्यावा लागला. आणि हे सरकार केवळ ८० तास टिकलं.
महत्वाच्या बातम्या – पवारांवर केलेल्या टिकेबद्दल चंद्रकांत पाटलांनी मागितली माफी!
रोहित पवारांकडून मोदींचे कौतुक! म्हणाले…