ग्रेटर हैद्राबाद महानगरपालिका निवडणुकी प्रचारासाठी आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला.
यावेळी आदित्यनाथ यांनी “मला काही लोकांनी विचारलं की हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? मी म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” असे वक्तव्य केले.
परंतु त्यांच्या या वक्तव्याला एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी चांगलाच संताप दाखवला आहे. “तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही,” असे म्हणत त्यांनी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
तसेच त्यांनी “तुमची संपूर्ण पिढी संपून जाईल पण शहाराचं नाव हैद्राबादच राहणार आहे. निवडणूक हैदराबाद आणि भाग्यनगरदरम्यान आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हैदराबादच नाव बदलू नये तर एमआयएमलाच मतदान करा,” असं आवाहनही ओवेसी यांनी केलं. “ते (भाजपा) नाव बदलू इच्छित आहेत. त्यांना सर्व जागांची नावं बदलायची आहेत. तुमचं नाव बदललं जाईल पण हैदराबादचं नाव बदललं जाणार नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात आणि हैदराबादचं नाव बदलणार असल्याचं म्हणतात. तुम्ही काय ठेका घेतला आहे का?,” म्हणत योगी आदित्यनाथ यांना प्रश्न विचारले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
तुमचा रक्तगट ‘हा’ आहे? मग तुम्हाला कोरोनाची भिती नाही; वाचा संशोधक काय सांगत आहे
मनोहरलाल खट्टर यांच्या ‘या’ वक्तव्यामुळे शेतकरी आंदोलनाला लागले वेगळे वळण म्हणाले……