मुंबई | गेली पाच दिवस दिल्लीत कषी विधेयका विरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे, हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने यावर आरोप प्रत्यारोप सुुरु झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.
संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “जो शेतकरी आपला अन्नदाता त्याला तुम्ही देशद्रोही आणि दहशतवादी म्हणत आहात, पंजाब आणि हरियानातील शेतकरी हे महाराष्ट्रासारखेच आहेत, देशातील जी प्रमुख राज्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्रासह पंजाब आणि हरियानाचा देखील समावेश आहे. हा देश सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते शेतकरी काय दहशतवादी आहेत का?
यासोबतच, “बळाचा वापर करायचा असेलच तर चीन सिमेवर करा” असा टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी लगावला.