गुरुवारी केंद्र सरकारने तडजोड करत तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत भूमिका घेतली. मात्र ‘तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्दच करावेत,’ असे म्हणत शेतकऱ्यांनी हि तडजोड अमान्य केली. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या निर्णयाला शिवसेनेने ‘हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं’ असं म्हणत टोला लगावला आहे.
तसेच “मोदी सरकारचे तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करा अशी शेतकऱयांची मागणी आहे. मोदी सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले व कृषी कायदे कसे साखरेच्या पाकात घोळून बाहेर काढले आहेत त्याचे प्रात्यक्षिक दाखवले, पण शेतकरी नेते सरकारचे चहा-पाणी न पिता बैठकीतून निघून गेले,” अशी टिका देखील शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखामधून केंद्रावर केली आहे.
“मोदी सरकारने अन्यायाची नोटाबंदी पचवून ढेकर दिला. जीएसटीने केलेला सत्यानाश पचवला. बेरोजगारी, महागाईवर हिंदू-मुसलमान झगडा, हिंदुस्थान- पाकिस्तानचा उपाय दिला. लॉक डाऊनने जेरीस आलेल्या जनतेला अयोध्येत राममंदिराचे तबक दिले, पण पंजाबच्या शेतकऱ्यांसमोर त्यांचे कोणतेही ‘लॉलीपॉप’ चालले नाही. हे यश पंजाबच्या एकीत आहे.” असे देखील या अग्रलेखात सेनेने म्हणले आहे.
वाचा – आजपासून बेस्टच्या २६ एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल….
पतंजली डाबरसह इतर बड्या कंपन्यांच्या मधात ७७ टक्क्यांपर्यंत भेसळ – CSE