राज्यातील शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महविकास आघाडीचे नेते भाजप नेत्यांना चांगलाचा टोला लागवला आहेत. राज्यातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीने भाजपला चांगलाच हादरा दिला आहे. या निवडणूकीत महाविकास आघाडीने बाजी मारत फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांवर राज्यभरातुन टीका होत आहेत. सेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी ही चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीपूर्वी निवडून आलो नाही तर हिमालयात जाण्याच्या वक्तव्याची आठवण करून दिली.
दैनिक दिव्य मराठी ने दिलेल्या माहितीनुसार, मी जर कोल्हापूरमधन निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या या विधानाची दाखल घेत अब्दुल सत्तार औरंगाबाद मध्ये बोलत असताना म्हणाले की, “चंद्रकांत पाटील हे शब्दाला पक्के आहेत. त्यांनी आता खरंच हिमालयात जायला पाहिजे. ते जर तिकडे गेले तर आम्ही त्यांची पूर्ण व्यवस्था करू” असा टोला लगावला.
यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, विधानसभा निवडणूक लढविण्याचा आदेश मला पक्षाने दिला. तुम्ही पुण्यातून निवडणूक लढवावी असं मला त्यावेळी अमित शहा यांनी सांगितलं होतं. त्यावर मी त्यांच्यासोबत बराच युक्तिवाद केला. कोल्हापूर सोडून गेलो तर चुकीचा संदेश जाईल असेही मी म्हणालो. पण सगळा युक्तिवाद ऐकून झाल्यावर त्यांनी मला कोथरूडमधूनच निवडणूक लढण्याचा आदेश दिला.
तसेच पक्षाचा आदेश अंतिम असतो. त्यामुळे मी लढलो असे पाटील म्हणाले. कोल्हापूर जिल्ह्यातून ज्यांना कोणाला राजीनामा द्यावा वाटत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक लढवावी, त्यात जिंकून आलो नाही तर राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल’, असं आव्हान चंद्रकांत पाटील त्यांनी दिलं होत.
वाचा – मोदींच्या हस्ते १० डिसेंबरला नवीन संसद भवनाची पायाभरणी!
शेतकरी आंदोलनावरुन संयुक्त राष्ट्र संघाने भारताला दिला “हा” सल्ला!
“सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यावी”; शरद पवार यांचा सरकारला सल्ला