मुंबई। दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे सध्या राजकीय गोंधळ सुरु आहे. रावसाहेब दानवे यांनी जालना येथील एका कार्यक्रमात दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल. त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केले होते मात्र, आता त्यांना घरात जाऊन चोप द्यायची वेळ आली आहे” असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.
रावसाहेब दानवे यांनी “शेतकरी आंदोलन हे एक रचलेला डाव आहे असे म्हटले आहे. यामागे पाकिस्तान व चीनचा हात आहे” असा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावरती राज्यभरातून टीका होत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन कृषी कायद्यांचा देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. दानवेंच्या वक्तव्याचा विरोध म्हणून बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शिवली.
महत्वाच्या बातम्या – भारतात जरा जास्तच लोकशाही आहे! नीती आयोगाच्या सीईओ यांचं वादग्रस्त विधान..
दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायदा सज्ज…