आज राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचा जन्मदिवस आणि त्यांना आज विविध क्षेत्रातील लोक तसेच सर्वसामान्य लोक शुभेच्छा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल यांनी एक लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी काँगेसने अन्याय केल्याबद्दल उल्लेख केला आहे. याविषयी संजय राऊत यांनी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी विशिष्ट शैलीत एक उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“मी तर हे वारंवार म्हणत आहे की, काँग्रेसने पवारांवर अन्याय केला आहे. पवार हे असे नेते आहेत ज्यांना २५ वर्षात पंतप्रधानपदाची संधी मिळायला हवी होती. आज ते ८० वर्षांचे आहेत. असे मोठे नेते हे वयाच्या बंधनात अडकत राहत नाहीत. ते धावतात, पळत राहतात. सध्या देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारे ते नेते आहेत, परंतु दुर्दैवाची बाब अशी की, शरद पवार यांचं कर्तुत्व हेच त्यांच्या वाटेतील अडथळा ठरलं आहे. त्यांच्यापेक्षा कमी कुवत असणारे लोक हे त्यांना घाबरले आणि उत्तरेकडील नेत्यांनी त्यांच्या वाटेल अडथळे निर्माण केले. शरद पवार यांना द्वेष भावनेमुळे पंतप्रधान होऊ दिलं गेलं नाही.” असं संजय राऊत म्हणाले.
वाचा – “महासागराप्रमाणे खोली आणि…” म्हणत रोहित दादांनी दिल्या आजोबांना शुभेच्छा!