राज्य सरकार योग्य भूमिका मांडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना “राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आधीच्या काळात होते त्याच्यापेक्षा जास्त वकील दिले असल्याचं,” अजित पवार यांनी सांगितलं आहे. “आता जर कोणाला राजकारणच करायचं असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही,” असे पवारांनी म्हणले आहे.
“मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेतच ओबीसीबद्दलचे प्रश्न असतील किंवा मराठा समाजासंबंधी आरक्षणाचे प्रश्न असतील, कोणालाही धक्का न लावता हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षण प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. तारीख पुढे ढकलली आहे हे सर्वांना माहिती आहे. तारखेच्या वेळी चांगले वकील देण्याचं काम राज्य सरकार करत आहे,” असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.
तसेच “योग्य भूमिका वकील मांडणार आहेत. त्यांनी त्यांच्या काळात जेवढे वकील ठेवले होते ते तसेच ठेवले, शिवाय त्यात अजून काही दिले. जास्त चांगल्या पद्दतीने प्रकरण मांडता यावं यासाठीच हे केलं. आता जर यात कोणाला राजकारणच करायचं असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण आमची भूमिका स्पष्ट आहे. जसं आपल्या मुंबई हायकोर्टात ग्राह्य धरलं तसंच तिथं ते धरलं जावं म्हणून आम्ही मोठ्या खंडपीठाकडे गेलो”.
“प्रकरण सुप्रीम कोर्टात असताना राज्य सरकारला कोणी प्रश्न विचारु शकतं का? आरक्षणाचा मुद्दा सोडून बाकीच्या प्रश्नांवर सरकार कधीही चर्चा करण्यास तयार आहे. मुख्यमंत्री, अशोक चव्हाण अशा काही मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा झाल्यानंतर संभाजीराजे यांनी स्वत: बाहेर येऊन चर्चा सकारात्मक झाल्याचं सांगितलं होतं,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.
वाचा – Fact check: शेतकरी आंदोलन-ओबामा यांचा आंदोलनाला पाठिंबा?
पेरूने थांबवली चीनच्या सिनोफार्मची चाचणी; स्वयंसेवकावर लसीचा विपरीत परिणाम…