सध्या महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहायला लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुका सोबतच काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणार आहे. यामध्ये इंदापूर तालुक्यातील “कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचीही निवडणूक लागणार आहे.
मात्र इंदापूर तालुक्यात निवडणुका होण्याअगोदरच “यंदा पलटी” अशा प्रकारचे फोटो सोशल मीडियावर फिरायला लागले आहेत. त्यामुळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१५ ला झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये चेअरमन हर्षवर्धन पाटील यांनी हुशारी करून श्रीमती पद्माताई भोसले यांचा चेहरा पुढे केल्याने कारखान्यावर वर्चस्व राखण्यामध्ये त्यांना यश आले.
मा.खा.स्व.शंकररावजी पाटील यांच्या कन्या पद्माताई भोसले यांच्याकडे पाहून कारखान्याच्या सभासदांनी त्यांना विजयी केले. मात्र निवडून आल्यावर हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याचे चेअरमन पद पण स्वतःकडे ठेवून मतदारांनी दिलेला कौल धुळीस मिळवला.
मागील ५ वर्षांमध्ये शेतकऱ्यांचे झालेले अतोनात हाल, ऊस बिल संदर्भात दिरंगाई, कामगारांचे पगाराचे हाल पाहता ह्या वर्षी पाटील यांच्या ताब्यात कारखाना राहतोय का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
त्यामुळे इंदापूर मधील साखर कारखान्याच्या निवडणुकीत खरंच पलटी होणार का याची वाट पाहावी लागेल.