गेल्या तेरा वर्षापूर्वी मुंबईत झालेल्या २६/११ हल्ल्याचा सुत्रधार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी जकीउर रहमान लखवी याला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार इतर दहशतवाद्यांना मदत आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी लखवीवर हि कारवाई करण्यात आली आहे.
रहमान लखवी याने हाफीज सईदसोबत मिळून २६/११ च्या हल्ल्याचा कट रचला होता. या घटनेनंतर युएनएससीच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्रांद्वारे जागतीक दहशतवादी म्हणून लखवीला घोषीत करण्यात आले होते.
दरम्यान २६/११च्या हल्ल्यात दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाच्या १० सशस्त्र दहशतवाद्यांनी मुंबई शहरात गोळीबार केला होता. या हल्ल्यात १६६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते.