राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्कार आरोपाप्रकरणी रेणू शर्माने “तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते” या आपल्या विधानावरून राज्यभर सुरू असलेल्या चर्चेला कलाटणी दिली आहे. आपल्या एका ट्विट मधून रेणू यांनी “एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे तर मी माघार घेते,” असं म्हणलं आहे.
Ek kaam kariye aap sab hi Faisal le lijiye ,Bina kuchh Jane agar aap sab our jo mujhe jante hen wo bhi galat arop laga rahe hen to aap sab mil k hi decide kar lo, Mai hi pichhe hat jati hun jaisa aap sab chah rahe ho
— renu sharma (@renusharma018) January 14, 2021
तसेच “जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा,” असं देखील आपल्या ट्विटमधून म्हणलं आहे.
Agar Mai galat hun to itne log ab tak kyu nahi aaye mere liye bolne, Mai pichhe hatungi to bhi mujhe apne aap par garv rahega ki pure Maharashtra men Mai akeli ladki lad rahi thi jabki maine kisi party vishesh ka naam tak nahi liya our ab mujhe girane k liye
— renu sharma (@renusharma018) January 14, 2021