पुणे: आज 18 जानेवारीला राज्यातील ग्रामपंचायत 12711 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर होणार आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे गुलाल उधळत, मिरवणुका काढत स्वागत केलं जातं. मात्र या वेळेस विजयी उमेदवारांना आपल्या आनंदावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार निवडणुकीच्या निकालानंतर फटाके फोडणे, गुलाल उधळणे, मिरवणूक काढणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तसंच निकालानंतर दोन दिवस हॉटेल आणि खानावळीवर देखील बंदी असणार आहे.
नियमांचे उल्लंघन केल्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
16 जानेवारीला महाराष्ट्रात 12,711 ग्रामपंचायतीचे निवडणुका घेण्यात आल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या निवडणुकीत 79% मतदारांनी आपले मत नोंदवले आहे. 18 जानेवारीला निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. मात्र निकालानंतर अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी मिरवणुका, गुलाल उधळण, फटाके फोडणे यासारख्या कार्यक्रमांवर बंदी घातली आहे.