कोरोनानंतर बर्ड फ्लूच्या प्रदुर्भावास सुरुवात झाली आहे. राज्यातही अनेक ठिकानी बर्ड फ्लूचे सावविषाणू सापडत आहेत. याच पार्श्वभूमीवर पशु संवर्धन मंत्र्यांनी सर्वाना आवाहन केले आहे. बर्ड फ्लू हा विषाणू कुक्कुट पक्षांच्या मांसाद्वारे होत नाही. यामुळे तुम्ही चिकन,अंडी,मासे खाऊ शकता अशी माहिती राज्याचे दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे.
राज्यात बर्डफ्लू नियंत्रणामध्ये आहे,त्यामुळे घाबरू नये. बर्ड फ्लूचा प्रसार हा मांस,अंडी किंवा मासे खाल्याने होत नाही, यामुळे अफवांना बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले आहे. मुळशी येथील नांदे येथे पहिला बर्ड फ्लूचा विषाणू सापडला आहे. यामुळे तेथील पोल्ट्रीमधील पाच हजाराहून अधिक कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आली आहे.
लातूर येथील दोन गावासोबत उदगीर तालुक्यात देखील बर्ड फ्लूचा विषाणू सापडला आहे. पंढरपूर येथील मंगळवेढा तर परभणी जिल्ह्यातही दिवसेंदिवस बर्ड फ्लूचा प्रसार वाढत चालला आहे. याचबरोबर, आंबेजोगाई, नांदेड या जिल्ह्यातसुद्धा बर्ड फ्लूचा शिरकाव झाला आहे. या परिस्थितीमुळे कुकुटपालन व्यावसायिक सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. बर्ड फ्लूमुळे अनेक ठिकाणी पक्षांना दयामरण देण्यास सुरुवात केली आहे.