चीनने घुसखोरी करत भारताच्या हद्दीत वसवलं नवीन गाव; राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींच्या आश्वासनावर उभं केलं प्रश्नचिन्ह
मागच्या काही दिवसांपूर्वी चीनने हद्द ओलांडून लडाखमध्ये घुसखोरी केली होती त्यानंतर पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये एक गाव वसवले आहे, त्यामध्ये सुमारे १०१ घरं असल्याचं अंदाज आहे. याबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक खोचक ट्विट करत मोदींना टोला लगावला आहे. Remembering his promise- “मैं देश नही झुकने दुंगा” अशा प्रकारे कॅप्शन टाकत त्यांनी ही बातमी शेअर केली आहे.
Remember his promise- “मैं देश झुकने नहीं दूँगा।” pic.twitter.com/NdXT4hqkNK
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 19, 2021
नक्की काय आहे प्रकरण?
चीनने वसवलेलं हे गाव हद्दीपासून साधारण ४.५ किमी आतमध्ये वसवण्यात आलं आहे. चीनच्या अशा भूमिकेमुळे इतर देश देखील त्रस्त झाले आहेत. एका बाजूला लडाख प्रकरणाचा निकाल आणि चर्चा चालू असताना दुसऱ्या अशा प्रकारच्या आक्रमक विस्तारवादाची भूमिका चीन घेत आहे. हे गाव चीनने सुबनशिरी जिल्ह्यातील त्सारी चू या नदीकाठी वसवलं आहे. सॅटेलाईट मधून घेतलेल्या फोटोमधून ही गोष्ट स्पष्ट दिसून येत आहे.
ही एक चिंतेची बाब आहे. यामधून पुन्हा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.