भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आज खूपच चांगली गोष्ट घडली आहे. भारताने आज टेस्ट क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात धूळ चारत २-१ अशी बाजी मारली आहे. यामध्ये शुबमन गिल (९१), चेतेश्वर पुजारा(५६) तर रिषभ पंत (८५*) यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे.
या सिरीजमधील पहिल्या मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला होता. मात्र त्यानंतर अजिंक्य राहणे यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पुढील सामन्यांमध्ये विजयी कामगिरी करत इतिहास रचला आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये भारताने ८ गाडी राखत विजय मिळवला होता, तिसरा सामना अनिर्णीत तर चौथा सामना भारताने सहजपणे खिशात टाकला.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धाव केल्या होत्या, या बदल्यात भारताने ३३६ धावा केल्या. अर्थात यामध्ये ऑस्ट्रेलियाची आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या डावानंतर भारतासमोर ३२८ धावांचे आव्हान होते, मात्र भारताने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि रिषभ पंत यांच्या खेळीच्या जोरावर भारताने हे आव्हान सहज पार केलं.