अर्णब गोस्वामी व्हॉट्सअॅप चॅट प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आपल्या एका ट्विट मधून पवारांनी ‘यही पुछता है भारत!’,” असं म्हणत भाजपाला या प्रकरणी जाब विचारला आहे.
“लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपाभक्त पत्रकाराला भाजपाच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपाच्या त्या नेत्यांनी सांगावं.” असं म्हणत त्यांनी अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर आंदोलन केलेल्या भाजपा नेत्यांना प्रश्न विचारला आहे.
लोकांचे विषय मांडणारे लेखक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपभक्त पत्रकाराला भाजपच्या अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता या कथित पत्रकाराचा खरा चेहरा पुढं आल्यानंतरही तो आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या त्या नेत्यांनी सांगावं.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2021
तसेच “फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, ‘यही पुछता है भारत!’,” असे देखील ते आपल्या ट्विट मध्ये म्हणले आहेत.
फक्त सांगणं पुरेसं नाही किंबहुना केंद्रात सत्ताही त्यांचीच आहे. त्यामुळं या कथित पत्रकारावर कठोर कारवाई केली जाईल की सोयीस्कर पाठीशी घातलं जाईल, 'यही पुछता है भारत!'
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 19, 2021