केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या दोन महिन्यांच्यावर दिल्लीच्या सीमारेषेवर आंदोलन करणारे शेतकरी येत्या २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढणार आहेत. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढण्याच्या आपल्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहे. मात्र हि रॅली उधळून लावण्यासाठी चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचला जात असल्याचे नुकतीच माहिती समोर आली आहे. हा कट रचणाऱ्या या आरोपींला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
शेतकरी नेत्यांनी आरोपीला आंदोलनस्थळी पकडले होते. यानंतर शुक्रवारी रात्री आंदोलक शेतकऱ्यांनी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर उभे केले. त्यानंतर या व्यक्तीनं चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला असून ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट रचला गेला असल्याची कबुली दिली.
दरम्यान “२६ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या रॅलीत उधळून लावण्यासाठी चार नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल होता. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हे केलं जाणार होतं. यासाठी आमच्या टीममधील अर्धे लोक पोलिसांची वेशभूषा करून रॅलीत घुसणार होते. व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या चार नेत्यांचे फोटो आम्हाला देण्यात आले होते. ज्या व्यक्तीनं आम्हाला हे सांगितलं, तो स्वतः पोलीस आहे,” असे आरोपीने स्पष्ट सांगितले आहे.