संविधान गांगुर्डे | ‘जॉर्ज फ्लोईड’ हा साधारणतः वर्षभराने पुन्हा नजरेसमोर आलेला विषय आहे. ब्लॅक लिव्हज मॅटर हा ट्विटरवर हॅशटॅग या व्यक्तीच्या हत्याच्या पश्चात चालला असतांना अनेक ठिकाणी वातावरण असंतोषजनक झाले होते. अमेरिकेत गौरवर्णीयांचा छळ आणि निग्रोंवर होणार दमन, मालकीहक्क, अवहेलना आणि संघर्ष यांनी संपूर्ण इतिहास भरलेला असतांना, या असंवेदनशील घटनेला काल न्यायालयीन प्रक्रियेतून जावं लागलं. जॉर्जची हत्या करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला २२ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली गेली. परंतु विषमतेतुन वाढणाऱ्या खचात पुन्हा एकाची भर असाचं जगाचा इतिहास आहे. वर्ग, लिंग, जात, वर्ण, धर्म, धर्मातली पंथ अश्या खुपश्या दऱ्यांतून उत्क्रांती पासूनचा आजच्या तारखेचा प्रवास आहे.
सहा गौरवर्णीय आणि सहा निग्रो असा समतोल साधत हा निकाल अमेरिकेने देत या विषमतेला सध्या तरी उत्तर दिलं आहे. जॉर्जच्या हत्येच्या काळात काही गौरवर्णीय निग्रो लोकांसमोर गुडघ्यावर बसून माफी मागत असतांनाचा एक फोटो व्हायरल झाला होता. तसच जॉर्ज संदर्भात निघणाऱ्या अनेक मोर्चा -आंदोलनात ही अनेक गौरवर्णीय लोकांचा सहभाग दिसत होता.
डॉ. जनार्दन वाघमारे साहित्याच्या बाबतीत, हा बदल भारतात का जाणवला नाही? ‘अमेरिकेतील श्वेत लोकांनी निग्रो जीवन आपल्या वाङ्मयात चित्रित करण्याचा प्रयत्न केला, तसा येथील उच्चवर्णीय हिंदू लेखकांनी मात्र केलेला नाही’ असं निराशाजनक मांडतात. तेव्हा आम्हाला अमेरिकेतील जॉर्ज वर हळहळ व्यक्त करणाऱ्या भारतीय विषमतावादी ते पुरोगामी असा सर्वांचा समाचार घेणे भाग पडत. कारण ‘मगरीचे अश्रूंनी’ हळहळ व्यक्त करणारा हा वर्ग कधी येथील शोषितांसोबत ठाम उभा राहिला नाही, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे. किंवा, उभं राहतं असतांना सदैव संभ्रमित भूमिका घेतांना एक लक्ष्मणरेषा आखूनचं उभे राहिले.
जॉर्जच्या हत्येचा मागोवा घेत असतांना आम्हाला अनेक ऐतिहासिक गोष्टींचा मागोवा घेणे क्रमप्राप्त ठरत. निग्रो हा मूळचा अमेरिकन नाही. युरोपच्या वेगवेगळ्या विभागांत त्यांनी स्वतःच्या वसाहती स्थापल्या. त्यांना अमेरिकेत बळजबरीने नेऊन गुलामगिरी लादली गेली. आफ्रिकन रंग आणि मनाच्या पलीकडे त्यांच्याकडे परत जाण्यास ही काही नव्हतं. ते अमेरिकन संस्कृतीशी एकमत झाले होते. गौरवर्णीय लोकांनी त्यांच्यावर बहिष्कार आणि गुलामी लादली. विषमतावादी दृष्टीकोनाने त्यांच्या वाटेला अवहेलना, हलकी व घाणेरडी कामे मिळाली. श्वेत लोकांच्या वस्तीत त्यांना राहता येत नव्हते. परंतु अठराव्या शतकात केलेल्या बंडातून त्यांच्या स्वातंत्र्याचे मार्ग खुले झाले होते.
युरोपात जसा कृष्णवर्ण आणि गौरवर्ण संघर्ष होता, तसाच संघर्ष भारतात गेली हजारो वर्षे चालत आलेल्या वर्णव्यवस्थेमुळे होता. यामुळे इकडे भारतात दलितांच्या बाबतीत काही वेगळे नव्हते. निग्रोंची प्लेस आणि दलितांची पायरी, निग्रोंच्या वसाहती आणि दलितांच्या गावकुसाबाहेरच्या वस्त्या यांच्यात तस फार साम्य होत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी, नेतृत्वाने आणि दलितांच्या मुक्तीलढ्याने भारतात ही बंड आणले.
अमेरिकेतील Ku Klux Klan (KKK) या दहशतवादी श्वेत संघटनेने हजारों निग्रोंना सार्वजनिक ठिकाणी विटंबना करून मारून टाकले असा त्यांचा इतिहास येथील खैरलांजी, रमाबाई आंबेडकर नगर, मराठवाडा नामांतरातील दलित वस्त्यांवरील हल्ल्यांत जाणवतोचं. घट्टोत जीवन जगणाऱ्या निग्रोंसारखेचं संघर्षातून आज येथील दलित शिक्षित होत आहे. स्वतःचा आर्थिक दर्जा सुधारवत आहे. दैववाद सोडून विज्ञानाची कास धरत आहे.
आज निग्रो नागरिकांसोबत अपवादात्मक असमानतेची वागणूक मिळते देखील परंतु त्यांचं मान्यताप्राप्त नागरिकत्व , मुलभूत हक्क अबाधित ठेवण्यासाठी प्रशासन -शासन आणि सामान्यांतून ही सकारात्मक मदत होती. उलटार्थी ‘मनोहर कदमचं काय झालं?‘ असल्या कविता आज ही आमच्या देशात सादर कराव्या लागतातचं! या २१व्या शतकात प्रा. सुनील अवचारांसारख्या कवीला ‘वी आर द रिजेक्टड पीपल ऑफ इंडिया‘ सारखा कविता संग्रह प्रकाशित करावा लागतो. तसेच, सर्वचं स्तरावर मिळणार ‘प्रतिनिधित्व’ हा अमेरिकेत अधिकचा एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. किंबहुना कौतुकास्पदचं आहे! राजकारण, खेळ, सिनेसृष्टी अश्या अनेक क्षेत्रांत आता निग्रोंचं अस्तित्व जाणवतं. तेच आपल्या देशात प्रत्येक क्षेत्र सवर्ण – उच्चजातीयांनी भरलं आहे. जॉर्ज जर भारतात दलित म्हणून जन्मला असता तर येथे रडणारे उच्चवर्णीय, पुरोगामी दुर्मिळचं मिळाले असते. हे आमच्या समाजव्यवस्थेच वास्तव आहे.
आंबेडकरांच्या काळात गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर डाव्यांच्या भूमिका या येथील सामाजिक लढ्यांमध्ये आज ही बघायला मिळतात. त्यामुळे जॉर्जसाठी अश्रू गाळणारा, हळहळणारा भारतीय सवर्ण आणि सर्व पुरोगामी हे दांभिकचं वाटण्यास काही कारण नाही. कारण हा वर्ग श्वेतांसारख आपलं ‘प्रिव्हिलेज’ची वाटणी करण्यास, सामाजिक स्थर समताधिष्ठित बनवण्यास कुठूनचं सहभाग नोंदवतांना दिसत नाही. उलटार्थी त्यांवर राजकीय दमन लावत. जेथे डाव्या -पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांची सत्ता आहे तेथे ही दलित -आदिवासी हत्या, बलात्कारांसारख्या अन्यायावर मूग गिळून गप्प बसतं. भारतात स्वतःचं राजकीय वजन सिद्ध करण्याच्या प्रयत्नात पुरोगामी -प्रतिगामी पक्षांच्या युत्या -आघाड्या करून त्यांना चित करण्याचे षडयंत्र रचली जातात.
एकंदरीत, अमेरिका स्वर्ग आहे या निष्कर्षावर घेऊन जातोय असं माझं मत नाही. त्यांची दडपशाही, भांडवलीनिती हे जगभर सर्वज्ञान आहे. परंतु, त्यांनी स्वतःच्या राष्ट्रात निग्रोंचा दिलेलं स्वत्व हे भारतीय समाजापेक्षा पुष्कळस बरं आहे यात शंका नाही. जॉर्ज फ्लोईड सारखे प्रकरण आज तेथे घडत असले तरी भारतीय ऑट्रोसिटीच्या प्रकरणांसारखे ते लांबणीवर पडले नाहीत, हे फार बोलक आहे अश्याच निष्कर्षावर आम्हाला येऊन ठेपाव लागतं!
वाचा – तेलंगणाच्या मुख्यमंत्र्याचे विधान आणि दलित अत्याचाराचे प्रमुख कारण!
समिष्टीसाठी जगणारा महामेरू नामदेव ढसाळ….