कोरोनाने देशातील अनेक राज्यांचे कंबरडे मोडलेले आहे, याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनातील कामासाठी उत्तर प्रदेश प्रशासनाचे कौतुक केले आहे,.
यावेळी “उत्तर प्रदेश हे संपूर्ण देशात सर्वाधिक लसीकरण करणारं राज्यही बनलंय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला यूपी सरकारनं चांगल्या पद्धतीनं हाताळत आहेत, ज्या आजारांवर उपचार मिळवण्यासाठी कधी दिल्ली आणि मुंबईला जावं लागत होतं ते उपचार आज काशीत उपलब्ध आहेत,” अशा शब्दात मोदींनी उत्तरप्रदेश प्रशासनाचे कौतुक केले आहे.
यावर बोलताना कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मोदींवर निशाना साधला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्टिफिकेट दिलं म्हणून योगी सरकारचं करोना परिस्थिती हाताळण्यातलं अपयश लपत नाही” असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे.
मोदी जी के सर्टिफिकेट से यूपी में कोरोना की दूसरी लहर के दौरान योगी सरकार की आक्रामक क्रूरता, लापरवाही और अव्यवस्था की सच्चाई छिप नहीं सकती।
लोगों ने अपार पीड़ा, बेबसी का सामना अकेले किया। इस सच्चाई को मोदीजी, योगीजी भूल सकते हैं, जिन्होंने कोरोना का दर्द सहा, वे नहीं भूलेंगे
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) July 16, 2021
दरम्यान, “लोकांना अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं, असहाय्यपणे अडचणींचा सामना करावा लागला. नरेंद्र मोदी हे सत्य विसरू शकतात. पण ज्यांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भोगावा लागणारा त्रास सहन केला आहे ते कधीच विसरू शकणार नाही,” असं देखील प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या.