माळशिरस तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, यात एका मातंग समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर गावकऱ्यांनी अंत्यविधी करु न दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
माळशिरस तालुक्यातील माळवाडी बोरगाव येथील सरपंच दशरथ साठे यांच्या भावाचा मृत्यू झाला होता, यानंतर त्यांचा मृतदेह सार्वजनिक स्मशानभूमीत नेण्यात आला, मात्र गावातील काही जातीवादी मानसिकतेच्या गावगुंडानी अंत्यविधी करण्यास जोरदार विरोध केला आहे.
यामुळे संतप्त नातेवाईकांनी मृत व्यक्तीवर माळवाडी बोरगाव या ग्रामपंचायतीसमोर अंंत्यसंस्कार केले आहेत, या घटनेचा सध्या अनेक स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपुर्वी देशाने स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात पदार्पण केले, मात्र एवढी वर्ष होऊन देखील तळागाळीतील लोकांना अशा भयानक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,
दरम्यान, या घटनेनंतर पोलिस आणि प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही, मात्र अनेक स्थानिक सामाजिक संघटना या प्रकरणी कारवाईची मागणी करत आहे.
वाचा | अपयशी नेत्याला उत्तर देणं म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणं आहे -मिटकरी
राज ठाकरेंच्या टिकेला रोहित पवारांनी दिले उत्तर! वाचा काय म्हणाले रोहित पवार…
“दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर टीका करू नये, त्यांची तेवढी लायकी नाही”
“आदर्श लोकशाही कशी असावी हे मोदी सरकारच्या धोरणांकडे पाहून तुमच्या लक्षात येते”