मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबाद दौऱ्यावर असताना तेथे आयोजित केलेल्या एका जाहीर कार्यक्रमात व्यासपीठावर बसलेले रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे बघून त्यांनी “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख केल्यानंतर पुन्हा शिवसेना-भाजपा युती होणार का? अशी चर्चा सुरु झाली होती.
त्या पार्श्वभूमीवर“सरकार ५ वर्ष चालवायची कमिटमेंट आहे. शिवसेना शब्दांची पक्की असते. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही, शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही. ही शिवसेनेची खासियत आहे. आम्ही सगळे त्याच मार्गाने चालतो त्यामुळे हे सरकार पडेल, या भ्रमात कुणी राहू नये. असं म्हणत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
तसेच कुणाला पतंग उडवायचा असेल त्यांनी तो उडवत बसावं, कोणाचा पतंग कधी कापायचा आम्हाला माहितीये. त्यामुळे पाच वर्षे सरकार चालणार. कालच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने कुणाला आनंद झाला असेल तर त्यांना तीन वर्ष त्या आनंदात राहू द्या. सरकारला कोणताही धोका नाही, अशी ग्वाही संजय राऊतांनी यावेळी दिली.
दरम्यान महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. काल उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपले, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. राजकरणात कडवटपणा नसतो, एकमेकांचं तोंडच पाहायचं नाही, एकमेकांशी बोलायचंच नाही, असं महाराष्ट्रातील राजकारण नाही. हे चालत नाही महाराष्ट्रात. महाराष्ट्राला एक परंपरा आहे, असंही संजय राऊतांनी सांगितलं.
वाचा | मुख्यमंत्री ठाकरेंच्या “आजी-माजी-भावी” विधानामागचा नेमका अर्थ राऊतांनी सांगितला
राजस्थानात आता बालविवाहाची पण नोंदणी होणार! वादग्रस्त विधेयक मंजूर
“राहुल गांधी मोदींना पर्याय ठरू शकत नाहीत, ममता बॅनर्जींच विरोधी पक्षाचा चेहरा”
“भाजपचे अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात”;अजित पवारांचा गौप्यस्फोट