बारामती | मोरोपंत वक्तृत्व स्पर्धा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात जुनी आणि मानाची वक्तृत्व स्पर्धा मानली जाते, या ऐतिहासिक स्पर्धेने महाराष्ट्राला अनेक महान वक्ते दिले असून यंदा या स्पर्धेला ४८ वर्ष पुर्ण होत आहेत.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात, मात्र मागील दोन वर्षापासून जगभरात कोरोनाचे संकट आहे, यामुळे राज्यातील आणि देशातील सर्व शाळा महाविद्यालये बंद आहेत. याच पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे मोरोपंत वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धा यंदाही ऑनलाईन पध्दतीने पार पडणार आहे,
ही स्पर्धा कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील स्पर्धकांसाठी खुली असणार आहे, तसेच वादविवाद स्पर्धेसोबत उस्फूर्त वक्तृत्व स्पर्धचा देखील आयोजन असते, यात विद्यार्थांना ऐनेवेळी विषय दिला जातो आणि २ मिनिट विचार करून लगेच मनोगत व्यक्त करावे लागते.
येत्या ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मोरोपंत स्पर्धेने महाराष्ट्राला अनेक महान वक्ते दिले आहे, प्रसिध्द वक्ते नितिन बानगुडे पाटील, अविनाश धर्माधिकारी, यांनी देखील या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
दरम्यान, स्पर्धेत बोलण्यासाठी दर्जेदार विषय, परिक्षणासाठी योग्य परिक्षक आणि ४ दशकांची उज्वल परंपरा असलेली मोरोपंत ही महाराष्ट्रातील सर्वात मानाची मानली जाणारी वक्तृत्व स्पर्धा आहे. यामुळे मोरोपंत स्पर्धा जिंकणं हे प्रत्येक स्पर्धकाचे स्वप्न असते, यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेतात.
या स्पर्धेत आपल्याला स्पर्धक म्हणून सहभागी व्हायचं असेल तर वरिष्ठ महाविद्यालय गुगल फॉर्म लिंक – https://forms.gle/E9AnXfYHUQhLJng6A
कनिष्ठ महाविद्यालय गुगल फॉर्म लिंक – https://forms.gle/e7zZcWypJ6oZpR116
अधिक माहितीसाठी संपर्क- 9764296003