आयपीएल स्पर्धा आता अंतिम टप्प्यात आली आहे, साखळी फेरीतील शेवटचे काही सामने शिल्लक राहिले आहेत, साखळी फेरीतील ५१ वा सामना हेद्राबाद विरूध्द बंगलोर संघात पार पडला.
यंदाच्या सत्रात हैद्राबादचा संघ हा शेवटच्या स्थानावर आहे तर, किंग कोहलीचा बंगलोर संघ हा गुणतालिकेत ३ ऱ्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात हैद्राबाद संघाने विजय मिळवला आहे.
यामुळे आता बंगलोरच्या संघाला तिसऱ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागणार आहे, हैद्राबादच्या संघाने बंगलोर संघासमोर केवळ १४१ धावांचे लक्ष ठेवले होते, मात्र हेद्राबादच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे बंगलोरच्या संघाला ४ धावांनी पराभव स्विकारावा लागला आहे.
दरम्यान, या सामन्याच्या निकालानंतर पहिला क्वालिफायर सामना हा दिल्ली आणि चेन्नई संघात खेळला जाणार असल्याचे निश्चित झाले आहे, हा सामना येत्या १० ऑक्टोबरला पार पडेल.
वाचा | दिवाळीनंतर टप्प्याटप्प्याने महाविद्यालये सुरु होणार ! उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती