कोरोना लढाईत भारतासाठी आनंदाची बातमी असून भारताने शंभर कोटी लसींचा टप्पा पूर्ण केला आहे. कोविन ॲपवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी सकाळी 9 वाजून 47 मिनिटांनी भारताने 100 कोटी कोरोना लसीचे डोस देण्याचा इतिहास रचला आहे. india completed milestone of 100 crores corona vaccine
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
बधाई हो भारत!
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 21, 2021
दूरदर्शी प्रधानमंत्री श्री @NarendraModi जी के समर्थ नेतृत्व का यह प्रतिफल है।#VaccineCentury pic.twitter.com/11HCWNpFan
या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून लाल किल्ल्यावर 1 हजार 400 किलो वजनाचा खादी तिरंगा झेंडा फडकवला जाणार आहे. तसेच कैलाश खेर यांच्या आवाजातील एक गाणं प्रसिद्ध केलं जाणार आहे.
भारतातील लसीकरण मोहीम
16 जानेवारी 2021 ला भारतात कोरोना विरोधात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली होती. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईनवर काम करणारे लोक यांना सुरवातीला लस देण्यात आली.
1 मार्चपासून साठ वर्षाच्या वरील लोकांना लस उपलब्ध करण्यात आली. पुढच्याच महिन्यात म्हणजे 1 एप्रिलपासून वयोगट 40 वरच्या सगळ्या लोकांना लसीकरण सुरू झालं. त्यानंतर 1 मेपासून 18 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या सर्वांना कोरोबत लस द्यायला सुरूवात झाली.