गुरुवारी देशात १०० कोटी नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाल्याने देशभरात केंद्र सरकारच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आले, शुक्रवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेसबूक लाईव्हद्वारे संपूर्ण देशाचे आभार देखील मानले होते.
संपूर्ण भारताची लोकसंख्या १३८ कोटी आहे, यात अनेक नागरिकांनी कोरोना लसीचा केवळ १ डोस घेतलेला आहे, यात ०-१८ वयोगातील लहान मुलांची संख्या ४० कोटींपेक्षा जास्त असून लहान मुलांचे लसीकरण झालेले नाही, मग देशात १०० कोटी नागरिकांना लस खरंच दिली का ? असा प्रश्न देशभऱातून उपस्थित केला जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार यांनी १०० कोटी लसीकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे, “100 कोटी लसीकरणाचा आकडा खोटा असून फक्त 23 कोटी नागरिकांनाच लस दिल्या गेल्या आहेत, आपण ही गोष्ट पुराव्याने सिद्ध करु” असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, देशातील वाढती महागाई, पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीवर कोणी बोलत नाही, असा टोला देखील राऊतांनी भाजपला लगावला.