विश्वचषक स्पर्धेतील मागील सामन्यात भारताने स्कॉटलंड संघावर दिमाखदार विजय मिळवला. या सामन्यात मोहम्मद शमीची भेदक गोलंदाजी आणि रोहित-राहुलच्या सलामीच्या खेळीमुळे भारताने हा सामना जिंकला.
यामुळे भारताला सेमी फायनल गाठण्याच्या थोड्याफार आशा अजूनही जिवंत आहेत. मात्र यासाठी आज होणाऱ्या न्युझीलंड विरूध्द अफगाणिस्तान सामन्याकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागलेले आहे.
या सामन्यात जर न्यूझीलंड संघ विजेता झाला तर भारताला सेमी फायनलमध्ये जाण्याच्या आशा संपणार आहेत. मात्र जर अफगाणिस्तानने हा सामना जिंकला तर मात्र भारत सेमी फायनलमध्ये जाण्याच्या शक्यता आहेत.
यामुळे या सामन्यासाठी संपूर्ण भारत आज अफगाणिस्तानच्या बाजूने उभा राहणार आहे. मात्र यात गंमतीचा भाग असा आहे की अफगाणिस्तानने जरी हा सामना जिंकला, तर त्यांचे देखील 6 गुण होणार आहेत. त्यामुळे अफगाणिस्तानने हा सामना कमी फरकाने जिंकला, तरच भारताला थोडीफार संधी आहे.