अमरावतीत घडलेल्या दंगलीला जबाबदार असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते हाजी अराफत यांनी नवाब मलिकांवर केला आहे. तसेच रजा अकादमीच्या प्रमुखांसोबत मलिकांचे जुने संबंध असल्याचा देखील दावा अराफत यांनी केला.
हाजी अराफत म्हणाले, “मुंबईतून अमरावतीत दंगली घडवण्यासाठी पैसे पुरवण्याचं काम नवाब मलिक यांनी केले. जेव्हा आझाद मैदानात दंगल करण्यात आली होती, तेव्हा देखील नवाब मलिक यांचा हात होता.”
आता नवाब मलिक हाजी अराफत यांनी केलेल्या आरोपांवर काय प्रत्युत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
अमरावतीत नेमकं काय घडलं होतं?
त्रिपुरात घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ अमरावती, मालेगाव आणि नांदेड या शहरांमध्ये मुस्लिम संघटनांकडून बंद पुकारण्यात आला होता. बंददरम्यान अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या.
दुकाने जाळण्यात आली, पोलिसांवर दगडफेक करण्यात आली.या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप करत आहेत.