राज्यात महाविकास आघाडी सरकारचा २ वर्षांचा कार्यकाल आता पुर्ण झाला आहे, राष्ट्रवादी, शिवसेना आणि कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते.
यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार पडून भाजप सत्तेत येणार याचे वेळोवेळी भाकीत केले आहे, मात्र आजवर हे भाकीत काही खरं ठरलं नाही.
याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचा दावा केला आहे. मार्च महिन्यात महाविकास आघाडीचे सरकार पडून भाजप सरकार येणार आहे असा दावा राणेंनी केला आहे.
दरम्यान, जयपूर दोऱ्यावर असताना नारायण राणेंनी हे विधान केले आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात अपेक्षित बदल दिसेल आणि भाजप सरकार पुन्हा सत्तेत येईल असा दावा नारायण राणेंनी केला आहे.