भारत विरुध्द न्यूझीलंड दुसऱ्या कसोटी सामन्यात न्युझीलंडच्या फलंदाजांनी भारतीय संघासमोर लोटांगण घातले आहे. या सामन्यात भारताने तब्बल ३७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
मयंक अगरवालने केलेल्या शतकामुळे पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने ३२५ धावा उभारल्या होत्या. यानंतर भारतीय फिरकीपटूंनी न्युझीलंडचा संघ केवळ ६२ धावांत गारद केला. फिरकीपटू अश्विनने ४ तर सिराजने ३ विकेट्स पटकावल्या.
यानंतर दुसऱ्या डावात भारताने २७६ धावांवर डाव घोषीत केला आणि न्यूझीलंडसमोर ५४० धावांने भव्य लक्ष्य उभा केले. धावांचा पाठलाग करत असताना न्युझीलंड संघाला केवळ १६७ धावा करता आल्या. यामुळे या सामन्यात तब्बल ३७२ धावांनी विजय मिळवला आहे.
दरम्यान या विजयासह भारताने ही मालिका देखील आपल्या खिशात घातली आहे. तसेच या सामन्यात अनेक विक्रम देखील भारतीय संघाने केले ते खालील प्रमाणे
१. कसोटी कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा ३९ वा विजय ठरला.
२. वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा हा सलग तिसरा विजय आहे.
३. भारतीय भूमीवर न्यूझीलंडविरुद्धच्या गेल्या ८ सामन्यांमधला टीम इंडियाचा हा ७ वा विजय आहे.
४. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धचा हा सलग चौथा विजय ठरला.