नागपूरच्या निलंबित एसटी कर्मचाऱ्यांनी चौकशीला दांडी मारल्याचे समोर आले आहे. नागपूरमध्ये संपावर असलेल्या ४३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले. या सर्वांना मंडळाने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
मात्र, एकही कर्मचारी चौकशीला हजर राहिला नाही. नागपुरात रोजंदारी गटातील ९० कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. तर ३२ एसटी कर्मचाऱ्यांची बदली झाली. तरीही कर्मचारी अद्याप संपावर ठाम आहेत.
आतापर्यंत एसटीच्या ४३५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलेला आहे. तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहे संपावर ठाम आहे कामावर परत येत नाही.
त्यामुळे नागपूर विभागातील बहुतांश एसटीची सेवा ठप्प झाली आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ४३४ नियमित कर्मचारी चौकशीला सुद्धा हजर राहत नाहीत.
कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, “आम्ही आमच्या दुःखात आहोत. आमच्या बांधवांनी आत्महत्या केली. आमच्या कुटुंबांमधील भाव, आमचे बंधू मरण पावले. त्यांचा आम्ही नैसर्गिकरित्या संविधानिक मार्गाने दुखवटा पाळला आहे. त्याच्यामुळे आम्ही कामावर जात नाही.”
कर्मचाऱ्यांचे असे देखील म्हणणे आहे की, त्यांचा दुखवटा पूर्ण झाल्यास ते कामावर परततील. आता या संपाची भाषा बदलल्याचे दिसत आहे. सर्व कर्मचारी संपावर ठाम आहे. नागपुरात नव्याने बस स्थानकातून एकही बस आज सुटलेली नाही.